पोस्ट्स

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा उमेदवारांची निवड

  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क              मुंबई, दि. २३ : राज्यातील सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, अशोकराव चव्हाण (माजी मुख्यमंत्री) आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाली.             राज्यसभेच्या १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार होती. राज्यात उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याची तारीख २० फेब्रुवारी होती. राज्यसभेवर महाराष्ट्राच्या सहा जागांसाठी सहा अर्ज प्राप्त झाल्याने, या सहा जणांची निवड करण्यात आली आहे. २ एप्रिल २०२४ मध्ये राज्यसभा सदस्यांची मुदत संपल्यानंतर या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे राज्य विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन ; वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

इमेज
मुंबई दि.२३, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक मानले जाणारे मनोहर जोशी  यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात  उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची पिंपरी चिंचवड शहर जम्बो कार्यकारिणी जाहीर

इमेज
पुणे दि.२१, (प्रतिनिधी - दयानंद गौडगांव) भा रतीय  जनता पार्टी युवा मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहराची  जंम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा मंगळवारी  संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पाडला. भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, पक्षाचे शहर चिटणीस नामदेव ढागे, संजय मंगोडिकर, राजू दुर्गे, शीतल शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष व संयोजक तुषार हिंगे, महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे, अल्पसंख्याक मोर्चाचे शाकिर शेख, कामगार प्रकोष्ठ नामदेव पवार, सांस्कृतिक प्रकोष्ठ विजय भिसे, किसान मोर्चाचे गुलाब बनकर, वैद्यकीय प्रकोष्ठ डॉ. प्रताप सोमवंशी, दिव्यांग सेलचे शिवदास हांडे, बेटी बचाओ बेटी पढाओचे प्रिती कामतीकर, वाहतुक सेलचे दीपक मोढवे पाटील, जैन प्रकोष्ठ संदेश गादिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.  भाजपा युवा मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी पुढीलप्रमाणे! उमेश सांडभोर, भूषण गायके, अक्षय कामठ...

आटपाडी चे आमदार अनिल बाबर यांचा आकस्मिक निधन; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली शोकभावना

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क  पुणे दि. ३१, आटपाडी विधानसभेचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते निमोनिया या आजाराशी झुंज देत होते. मात्र आज त्यांना मृत्यू झाला.  दरम्यान आ. बाबर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.  अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. आ. बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.   खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये आ. बाबर यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी  अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन ...

प्रजासत्ताक दिन निमित्त वक्रतुंड फिटनेस क्लब आयोजीत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

इमेज
जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क   प्रतिनिधी --हरि बोंबले प्रजासत्ताक दिन निमित्त वक्रतुंड फिटनेस क्लब आयोजीत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाला. या स्पर्धेत व्यायाम शाळेतील सर्व पुरुष व महिला एकूण दोनशे सभासंदानी सहभाग घेतला विजेत्या स्पर्धकांला रेंजर सायकल बक्षीस ठेवण्यात आले होते . पुरुष गटात प्रथम क्रंमाक प्रकाश दत्तात्रय बोंबले यांनी पटकावलातर महिला गटात सोनाली संदिप गाडे यांनी मिळविला तर सहभागी सर्व स्पर्धकांना ट्रॉफी व सन्मानचिह्न देण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन बाळासाहेब सांडभोर यांनी केले तर स्पर्धा आयोजन वक्रतुड फिटनेसचे सर्वेसर्वा विकासशेठ वाघमारे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसचलन कैलास दुधाळे यांनी केले तर आभार संपत गारगोटे यांनी केले.

पुण्यातील वेळअमावस्या स्नेह भोजनास आमदार सचिन कल्याणशेट्टी, सुनिभाऊ कांबळे व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची उपस्तिथी ; बसवेश्वर मित्र मंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्र मंडळ पुणे यांचा सलग 17 वर्षाचा विक्रम

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क पुणे (प्रतिनिधी) - बसवेश्वर मित्र मंडळ व अक्कलकोट तालुका रहिवासी मित्र मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. गेल्या १७ वर्षापासून पुण्यातील अक्कलकोट चे रहिवासी साठी वेळ अमावस्याचा  कार्यक्रम नित्य नियमाने दर वर्षी केला जात आहे विद्यमान आमदार सचिन  कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे  आणि पुणे कॅन्टोमेंट चे आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे यावेळी एकाच मंचावर उपस्थित होते. राजकारणात कितीही वैचारिक मतभेद असले तरी आपल्या गावाकडच्या लोकांना भेटण्यासाठी हे मतभेद विसरून एकत्र येवून आपली उपस्थिती दर्शवली व एकत्र च या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी हजोरो च्या संख्येने अक्कलकोट तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष म्हणजे महिला मंडळीनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली तसेच यावेळी जवळ जवळ ४००० लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला.  हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित व नियोजनबद्द केल्याबद्दल मा. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्याकडून आयोजकवरती कौतुकाचा वर्षाव झाला.कार्यक्रम दरम्यान साप्ताहिक गा...

शिवरायांच्या मावळ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या कर्तुत्वाचा झेंडा फडकवला पाहिजे - संपत गारगोटे* प्रतिनिधी--लतिफ शेख राजगुरुनगर: छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन येथिल प्रत्येक तरुणाने यश मिळवून जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवायला हवा तसेच इतिहास केवळ भुतकाळात मन रमण्यासाठी नसून प्रत्येकाने कर्तृत्व गाजवावे असे आव्हान संपत गारगोटे यांनी केले ते तिन्हेवाडी येथे साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या विशेष राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शक म्हणून माॅसाहेब जिजाऊंनी राजांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला म्हणुन तर राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले . आदिलशहा , इग्रज , मोगलांशी व इतर सत्ताधिशाशी संघर्ष करून राजांनी आपल्या कर्तुत्वाचा झेंडा जगाच्या इतिहासात आजारामर केला आणि त्यांच्याच वारसदारांनी आज वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून आपल्या कर्तुत्वाचा झेंडा सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा कारण छत्रपती शिवाजी राजांना अभिप्रेत असणारे काळाची पावले ओळखुन स्वराजाचा मावळा व्हावा असे आव्हान संपत गारगोटे यांनी केले . येथे प्रत्येक मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे निरव्यसनी व्हावं, छत्रपती शिवाजी राजांसारखे कार्यकर्तृत्व करावं ,राजांची दूरदृष्टी आत्मसात करावी आणि यश मिळवावे असे मार्गदर्शन व्याख्याते संपत गारगोटे यांनी विद्यार्थ्यांना केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचा दृष्टिकोन, त्यांचे नीती नियम हे प्रत्येक राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयसेवकांनी आत्मसाद करावे आणि खूप मोठे कार्य करावे असे आव्हान गारगोटे यांनी केले. यावेळेस कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून तिन्हेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षाताई पाचारणे तर या वेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालिका अश्विनीताई पाचारणे तसेच यावेळी या कार्यक्रमास ग्रापंचायत सदस्य प्रियंकाताई पाचारणे, रिपब्लिकन कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरीशभाई देखणे, कामगार नेते राज्जाकभाई शेख,सामाजिक कार्यकर्ते हेमंत विरकर, संवाद फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष निलेशजी ढवळे, महाविद्यालयाचे प्राचार्य जरे सर ,कार्यक्रमाचे कार्यक्रमाधिकारी पत्रकार गणेश आहेरकर सर,खेड तालुका कृषी अधिकारी नंदु वानी साहेब व अनेक मान्यवर उपस्थित होते.

इमेज
  जनलोक वार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी / लतिफ शेख, राजगुरुनगर: छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श घेऊन  येथिल प्रत्येक तरुणाने  यश मिळवून जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवायला हवा  तसेच  इतिहास केवळ भुतकाळात मन रमण्यासाठी नसून  प्रत्येकाने कर्तृत्व गाजवावे असे आव्हान संपत गारगोटे  यांनी केले ते तिन्हेवाडी येथे साहेबरावजी बुट्टेपाटील  महाविद्यालयाच्या विशेष राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना  मार्गदर्शक म्हणून माॅसाहेब जिजाऊंनी राजांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला म्हणुन तर  राजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले . आदिलशहा , इग्रज , मोगलांशी व इतर सत्ताधिशाशी  संघर्ष करून राजांनी आपल्या कर्तुत्वाचा झेंडा जगाच्या इतिहासात आजारामर केला आणि त्यांच्याच वारसदारांनी आज वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून आपल्या कर्तुत्वाचा झेंडा सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा कारण छत्रपती शिवाजी राजांना अभिप्रेत असणारे काळाची पावले ओळखुन  स्वराजाचा मावळा व्हावा असे आव्हान संपत गारगोटे यांन...